Thursday, April 11, 2013

"धर्मवीर छत्रपती श्री शंभू महादेव"

"धर्मवीर छत्रपती श्री शंभू महादेव"
आज गुढीपाडव्याच्या दिवशी मित्रांनो मी एका संकल्प करत आहे
,,,
परवा नेमही प्रमाणे वढू-तुळापूरला जायच्या तयारीत होतो
आम्ही एकंदर दहाजण होतो त्यानिमित्त तिथे गेल्यावर
आपल्या मित्रांसमोर काही बोलाव या उद्देशाने कागद वही हातात घेतली
मनात आहे ते कागदावर उतरवू पाठ करू आणि बोलू
अस ठरवलं आणि ,,,
मी लिहायला लागलो हि पेन त्या कागदावर झरझर चालत होता
मी लीहीत होतो,
अंदाजे आठ दहा पान पण लिहून झाली आणि लक्षात आल
मला जे बोलयचे आहे त्याच्या विपरीत लिहल आहे
पण जे लिहल होत तो एक संकल्पच ठरावा अशीच
शंभू महादेवाची ईच्छा  होती ?,आई आई भवानीची ईच्छा होती ?,
शिवरायांची ईच्छा होती ? काहि माहित नाही पण
लिहिता लिहिता मी अचानक एक
संकल्प करून बसलो होतो ,,,
गेल्या २\४ वर्षात श्र.भिडे गुरुजींच्या संपर्कात आलो तस तस 
श्री.संभाजी राजां बद्दल कुतूहल वाढत गेल
शाळा कॉलेजात असताना ऐकलेला-शिकवला गेलेला वाचलेला
शंभू महादेव नक्कीच त्याच्या विपरीत होता
आणि हळू हळू जास्तच कुतूहल वाढत गेल
आणि यावेळी तर मी संभाजी बलिदान मासा निमित्त
माझ्या घरातच शंभू राजांच पुस्तक त्यातली रोज १०\१५
वाचून दाखवू लागलो आणि त्याचा अर्थ हि सांगू लागलो
तस तसे श्री शंभू महादेव डोक्यात फिट्ट बसू लागले
आणि त्याचाच परिणाम म्हणू आता मला
माझ्या शब्दात
"धर्मवीर छत्रपती श्री शंभू महादेव "
एक चारित्र्यवान ,नीतीमान ,दिलदार ,कवी,दोस्तांवर जीवापाड प्रेम करणारा आणि छत्रपतींच चौदा चौक्ड्यांच राज्य टिकवण्यासाठी
स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा राजा
मांडायचा मोह होवून बसला आहे मला माहित नाही
हे शंभू महादेवाच शिव धनुष्य मी कस उचलणार आहे
पण संकल्प तर करून बसलो आहे कि
या पुढे श्री.शंभू महादेवाच चरित्र लोकां पर्यंत पोहचवायचं
त्यांच्या वरील केले गेलेले आरोप खोडायचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे
मी माझ्या समजणाऱ्या सध्या सरळ भाषेत
त्यांच्या चारित्र्यावर उडवले गेलेले शिंतोडे पुसण्याचा प्रयत्न करणार आहे
मित्रानो मला आपल्या सहकार्याची , आई भवानीच्या आशीर्वादाची गरज आहे
हे मला करायचं आहे कारण ,,
आज ज्या गुढी पाडव्याचा शुभेच्छा आपण आनंदातिरेकाने देत आहोत
त्या सणाची शान हि राखली गेली
ते फक्त आणि फक्त केवळ शंभू महादेवां मुळेच,,,
मंदिरांचे कळस आणि अंगणातली तुळस शाबूत राहिली
ती शंभू महादेवां मुळे,,,
सुवासिनींच कुंकू आणि हातातील  बांगड्या शाबूत राहिल्या
त्या शंभू महादेवां मुळेच ,,,
गायी गुर, संत सज्जन ,लेकी-सुना सारे निर्भयतेने जगले
ते शंभू महादेवां मुळे
गळ्यातल जानवे आणि डोक्यावरची शेंडी शाबुत राहिली
ती शंभू महादेवां मुळे,,,

म्हणूनच त्यांच्या वरील झालेल्या-केलेल्या आणि जाणून-बुजून
केलेल्या अन्यायाच परिमार्जन करणे हे मी माझ कर्तव्य समजतो
हे जर मी केल नाही तर माझ्या पुढील पिढ्या माफ करणार नाहीत.

सुनील भूमकर ,,

3 comments:

  1. Go ahead.. My best wishes to you.. Agadee aaturtene tujhya hya likhanakade laksh thevoon aahe.. Amvhya Shambhu Mahadeva baddal lihee, jevhadhe aparaadh aamha marathiyaani tyaanchya viruddh naahee naahee tya vichaar vyakt kele tyanchi dakhal hya aamchya marasann samajala de. Suneel bhau atyant mothe va teevr garaj asalele kary kareet aahant tumhi... Dev tumhaans he Shiv Dhanushy uchalanyaachi shakti devo.. Jay Jay Shambhuraje.. Jay jay Maharashtr..

    ReplyDelete
  2. Ganesh Shinde

    13 Apr (1 day ago)

    to me
    far chan...
    Dev tumhala yash devo....hich sadichya

    ReplyDelete
  3. https://mail.google.com/mail/?shva=1#inbox/13dfa8ce3f0ac9d5

    ReplyDelete