
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे
प्रयत्न हाणून पडण्यासाठी ,
आदिलशहाच्या दरबारात ,
"वो सिवा वो डोंगर का चुवा उसे तो मी झिंदा या मुर्दा
घेवूनच येतो अशी गर्जना करत निघालेल्या
घमेंडी,कपटी,धूर्त,कावेबाज,
अफझल खानच्या प्रयाणाची खबर समर्थ रामदास स्वामींनी
ज्या काव्यातून अत्यंत गुप्तेतेने श्री.शिवरायांना धाडली
ते हे काव्य ,,,,,,,,,
विवेके करावे कार्य साधन |
जाणार नरतनू हे जाणोन||
पुढील भविष्यार्थी मन |
राहाटोची नसे||१||
चालो नये असन्मार्गी
सत्यता बाणलिया अंगी ||
रघुवीर कृपा ते प्रसंगी |
दास महात्म्य वाढावी ||२||
रजनी नाथ आणि दिवाकर |
नित्यनेमे करिता संचार||
घालताती येरझारा |
लाविले भ्रमण जगदीशे ||३||
आदी माया मुळ भवानी |
हेची जगताची स्वामिनी ||
एकांती विवेक धरुनी |
ईष्ट योजना करावी ||४||
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वर वर पाहता गुरूने शिष्याला केलेला उपदेश वाटेल
पण प्रत्येक ओळीतील पहिला शब्द घेवून
"विजापुरचा सरदार निघाला आहे " असा गुप्त संदेश तयार होतो .
वास्तविक जगाच्या लष्करी ईतिहासात डोकावलं तर
लक्षात येईल असा महत्वचा संदेश काव्य रूंपात
रामदास स्वामिनीच फक्त पाठवला असेल .
No comments:
Post a Comment